रतनबाई – तरुण विवाहितेचे शब्दचित्र

3
280

हिंदुस्थानी महिलेने लिहिलेले आणि इंग्लंडमध्ये प्रकाशित झालेले पहिले पुस्तक मराठी लेखिकेचे होतेते लंडनमध्ये 1895 साली प्रसिद्ध झालेत्या पुस्तकाचे नाव Ratanbai  A Sketch of a Bombay High Caste Young Wife. त्या पुस्तकाच्या लेखक शेवंतीबाई निकंबे या होत्या. पुस्तकाच्या सतरा आवृत्त्या 1895 ते 2017 या काळात निघाल्या...

इंग्लंडमध्ये प्रकाशित झालेले आणि हिंदुस्थानी महिलेने लिहिलेले पहिले पुस्तक मराठी लेखिकेचे होतेते लंडनमध्ये 1895 साली प्रसिद्ध झालेत्या पुस्तकाचे नाव Ratanbai  A Sketch of a Bombay High Caste Young Wife. प्रकाशक होते मार्शल ब्रदर्सत्या पुस्तकाच्या लेखक शेवंतीबाई निकंबे या होत्या. पुस्तकाच्या सतरा आवृत्त्या 1895 ते 2017 या काळात निघाल्यालेखिकेने केवळ ते एक पुस्तक लिहिले असे नाहीत्यांनी उच्चवर्णीय विवाहितवयाने मोठ्या आणि विधवा यांच्यासाठी एक शाळाही 1890 साली काढलीशाळा सुरू झाली तेव्हा फक्त पाच विद्यार्थिनी दाखल झाल्या होत्या (रोकिया बेगम यांनी शाळा सुरू केली तेव्हाही पहिल्या दिवशी फक्त पाच विद्यर्थिनी होत्या).

निकंबे बाई ज्या पुस्तकामुळे विख्यात झाल्या त्या कथेची नायिका आहे ती अकरा वर्षांची रतनबाईतिचे लग्न ती नऊ वर्षांची असताना झाले आहेतिचा नवरा प्रतापराव हा पदवी परीक्षेचा अभ्यास करत आहेती ऋतुमती झालेली नसल्याने त्या काळच्या रीतीप्रमाणे माहेरी राहत आहेतिचे वडील वासुदेवराव हे यशस्वी वकील आहेत. त्यांनी ते आधुनिक विचारांचे असल्याने मुलीला शाळेत घातली आहेती तिसरीत आहे आणि मन लावून अभ्यास करत आहेत्या काळात उच्चवर्णीयांचे आचारविचार स्त्रियांच्या शैक्षणिक प्रगतीच्या आड येत होते. ते दाखवणे हा या कादंबरीचा हेतू असल्याने त्या उच्चवर्णीयांचे दैनंदिन जीवन कसे होते ते कादंबरीत दाखवले आहे.

उच्चवर्णीयांच्या आचारांचे वर्णन करताना त्या त्या शब्दांचे इंग्रजीत स्पेलिंग लिहून खाली तळटीप देऊन अर्थ स्पष्ट केला आहेउदाहरणार्थ धोतरसासरमाहेरझिम्माफुगडीबाबासारीबाळदादा इत्यादीत्या कथेत डोहाळजेवणहळदीकुंकूश्रावण सोमवारमंगळागौरीचे व्रत इत्यादी सणांची दैनंदिन आचारांची वर्णनेदेखील येता.

रतनबाई हिचा नवरा– प्रतापराव शिकत होता आणि तिचे सासरे वारल्यानंतर, घरचा कारभार तिच्या सासऱ्यांचा भाऊ बघत होतारतनबाईच्या सासूला काही महत्त्व नव्हतेनवऱ्याची चुलती मुलींनी शिक्षण घेण्याच्या विरूद्ध होतीरतन सासरी काही कारणाने राहिली तर तिला शाळेत पाठवले जात नसेचपण अभ्यासाच्या पुस्तकांना हातही लावू दिला जात नसेत्यामुळे सासरी गेलेली रतन अतिशय घुसमटून जादिवस असे जात असताना एके दिवशी तिचा चुलता मरण पावतोतो आजारी असल्याची तार येतेती घरात कोणाला वाचता येत नाहीउच्चवर्णीयांच्या घरातील हे तत्कालीन वास्तव होतेतार बघून रतनचे वडील त्यांच्या भावाला भेटण्यास म्हणून गेले आणि पाच दिवसांनी परत आले ते केशवपन केलेल्या त्यांच्या विधवा भावजयीला घेऊन तसे ते येतात आणि दुःखाने व्याकुळ झालेली असली तरी त्यांची आत्या (तीही विधवाच होतीचुलत सुनेला दूषणे देतेमाणसाला गिळणारी हडळ वगैरे म्हणतेती तिचे अस्तित्व आपला दिनू गेलाती आता आपली कोणी नाही’ अशा शब्दांत पुसून टाकू बघते.

तो चुलता मेला कसातर साथीत. ‘सिंहस्थ आले की साथी येतात या वाक्याने हिंदूंच्या जत्रा आणि यात्रांचे भीषण वास्तव (एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस असलेलेप्रट होतेपुढे होते असे, की रतनबाईची सासू, तिला सुनेचे शाळेत जाणे तिला पसंत नाही अशी तक्रार रतनबाईच्या आईच्या कानावर जाईल अशी व्यवस्था करते आणि रतनबाईच्या वडिलांची काकू रतनबाईच्या वडिलांना रतनचे शाळेत जाणे बंद करण्यास भाग पाडतेम्हणजे येथेही पुन्हा एकदा स्त्रीची प्रगती खुंटवणारी स्त्रीच असते हे दाखवून दिले जाते.

 आता हा निर्णय बदलतो कसा ?

रतनचा एक नातेवाईक (चुलत बहिणीचा नवराबी ए परीक्षा उत्तम रीतीने उत्तीर्ण होतोत्याचे वडील त्याला म्हणतात, तुला हवी ती भेट मागतो सांगतो, तुम्ही माझ्या पत्नीची शाळा चालू ठेवलीत तर त्यामुळे मला सर्वात जास्त आनंद होईलतुम्ही माझ्या आईचे मन वळवा आणि पत्नीची शाळा सुरू करात्या मुलीला सोबत म्हणून रतन पुन्हा शाळेत जाऊ लागतेती परवानगी कशी मिळवली जाते तो प्रसंग फार चित्रमय पद्धतीने मांडला आहे.

ज्या मुलीची शाळा सुरू ठेवण्याचा प्रस्ताव येतो तिचे सासरे रतनच्या वडिलांना विनंती करतात, की तुमच्या मुलीला माझ्या सुनेबरोबर शाळेत जाऊ देत्यावर रतनचे  वडील सांगतातलग्न झाल्यानंतर मुलगी तिच्या आईवडिलांची नसतेतेव्हा तिच्या सासरची परवानगी घेण्यास हवीत्यामुळे रतनच्या चुलत बहिणीचे सासरे रतनच्या चुलत सासऱ्याला विचारताकारण त्या घराचा कर्ता पुरुष तोच असतोचुलत सासरा रतनच्या सासुबाईला हाक मारतो तेव्हा ती अर्ध्या बंद दाराआड उभी राहते (कारण परपुरुषासमोर कोणत्याही स्त्रीनेआणि विधवा स्त्रीने तर अजिबात जायचे नाही असा रिवाज). सासू म्हणते मी बाळला (म्हणजे रतनच्या नवऱ्यालाविचारतेतो स्त्रीशिक्षणाच्या बाजूने असतोचतर असा हा घास हात लांबवून घेतला जातो !

अशा तऱ्हेने, रतन पुन्हा शाळेत जातेएक शिकवणीही तिच्यासाठी मागील अभ्यास भरून काढण्यासाठी लावली जातेती वार्षिक परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होतेदुर्दैवाने तिचा नवरा प्रतापराव बी ए च्या परीक्षेत अनुत्तीर्ण होतोलगेच, रतनची शाळा बंद केली जातेशाळेत तिला बक्षीस समारंभात बक्षीस दिले जाणार असते, त्या समारंभालाही तिला हजर राहू दिले जात नाहीपुरुषी वर्चस्व उफाळून येतेप्रतापराव परीक्षेला पुन्हा सहा महिन्यांनी बसतोरतनला सांगण्यात येतेकी नवरा पास व्हावा अशी प्रार्थना देवाकडे करप्रतापराव पास होतोपेपरात नाव छापून येते तेव्हा ती प्रथमच नवऱ्याचे नाव दोनतीन वेळा उच्चारतेतोपर्यंत तिने ते उखाण्याच घेतलेले असते (उच्चवर्णीय विवाहितेचे शब्दचित्र हे असे).

एवढे सारे होऊनही रतनची सासू तिला शाळेत जाऊ न देण्यावर ठाम असतेती तिला बोलून बोलून हैराण करतेअभ्यासाला हात लावू देत नाहीरतन शाळेत मागे पडू लागतेसासूची मजल येथपर्यंत जाते की ती सुनेला धमकी देते, “तू माळ्याकडे वाईट नजरेने बघत होतीस असे मी प्रतापरावाला सांगेन. अखेर, एके दिवशी रतनची आई मृत्यू पावतेरतनच्या काकू तिच्या दुसऱ्या विधवा सुनेला पुन्हा दूषणे देतासून कंटाळून आत्महत्या करू पाहते. तिला एक सुधारक वाचवतो.

प्रतापराव बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला जातोमात्र जाताना त्याच्या पत्नीला शाळेत पाठलेच पाहिजे असे बजावून जातोत्याच्या पाच वर्षांच्या परदेशी वास्तव्य काळातत्याची काकी (विधवामिशनच्या होममध्ये शिक्षण घेऊन शिक्षिका बनतेती विधवा स्त्रियांवर असलेली पोशाखकेशवपन इत्यादी बंधने झुगारून देतेप्रतापराव परत येतोरतन पत्नी बनण्याच्या वयात आली आहेअखेर ती दोघे समारंभपूर्वक पतीपत्नी म्हणून एकत्र येतातत्या समारंभाचे तपशील रंजक वाटताउखाणेवजा ओळी दोघे म्हणतात – त्यानंतर त्याने तिला आपले पाय कोरडे करू दिलेतिने ते कोरडे केले आणि त्याच्या पावलांवर सुगंधी चूर्ण टाकलेते टाकताना तिने म्हटले – आला आहे वसंतपक्षी आहेत गातप्रतापरावांच्या गुणांनी होईल आनंदाची बरसात !

अशाच काही काव्यपंक्ती प्रतापरावाच्या तोंडीही घातल्या आहेतसमारंभ संपतोमेजवानी होते आणि अखेर, पतिपत्नी त्यांच्या खोलीत येतातदोघांनाही एकच पुस्तक प्रिय आहे असा साक्षात्कार दोघांना होतो आणि तेथे कथा संपते.

या कथेची वैशिष्ट्ये नोंदणे जरूरीचे आहेपहिले म्हणजे ही कथा एका मराठी स्त्रीनेइंग्रजीत लिहिली आणि ती ब्रिटनमध्ये प्रकाशित झालीदुसरेउच्चवर्णीयांच्या दैनंदिन जीवनाचा परिचय करून देणे आणि कुतूहल शमवणे किंवा मनोरंजन करणे हा हेतू त्यामागे नव्हताती कथा मुलींना शिक्षण देणे आवश्यक आहे हे ठसवणे ह्या हेतूने लिहिली आहेतिसरेसाधारणपणे, स्त्रियांचे जे दमन एकोणिसाव्या शतकात होत होते त्याला पुरुषप्रधान संस्कृती कारणीभूत होती आणि अन्याय पुरुष करत असत, पण या कथेत रतन हिला शिक्षण देणारे किंवा देऊ पाहणारे सारे पुरुष होते आणि विरोध केला तो घरातील म्हाताऱ्या आणि अधिकारावर असलेल्या स्त्रियांनीइतकेच नाही तर स्त्रियांनी केलेल्या विरोधापुढे पुरुषांनीही नांगी टाकलेली दाखवले आहे.

लेखिका शेवंतीबाई यांच्याबद्दल तपशील फार उपलब्ध होत नाहीतत्यांचा जन्म 1865 साली पुणे येथे झालात्या ख्रिस्ती होत्यापरंतु त्यांचे आईवडील कोण याचे तपशील मिळाले नाहीतनिकंबे हे त्यांच्या पतीचे आडनावपती माधवराव निकंबे हे रेव्हरंड होतेपंडिता रमाबाई यांचे शारदा सदन पुण्याला स्थानांतरित 1890 साली झालेत्यापूर्वी शेवंतीबाई यांनी रमाबाईंच्या सहायक म्हणून काम केलेत्यानंतर त्यांनी स्वतःची शाळा काढलीत्यांचे 1895 साली प्रकाशित झालेले उपरोक्त पुस्तक त्यांनी भक्तिभावाने इंग्लंडच्या महाराणींना अर्पण केले आहेत्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली होती मुंबईचे गव्हर्नर (कैहॅरिस यांच्या पत्नी लेडी अडा हॅरिस यांनीत्यांनी प्रस्तावनेत शेवंतीबाई यांनी सुरू केलेल्या शाळेला मी भेट दिली आणि त्या स्त्रियांच्या शिक्षणासाठी किती मौल्यवान कार्य करत आहेत हे बघून मला खूप समाधान झाले’ असे म्हटले आहे.

लेखिकेने रतनबाई यांनी कादंबरीत ख्रिस्ती धर्माचा छुपा प्रचार केला आहे असा आक्षेप त्यांच्यावर एका अभ्यासकाने घेतला होतारतनबाई यांचे काका सिंहस्थानंतर आलेल्या पटकीच्या साथीत दगावले आणि अशा साथी यात्रा व मेळावे यानंतर येतातच ह्या विधानामुळे हिंदूंच्या धार्मिक यात्रांचा अधिक्षेप होतो अशी समजूत टीकाकारांची असावीतसेच, शाळेच्या प्रमुख बाई मुलींना त्यांच्या घरी चहाफराळ यासाठी बोलावत आणि मुलींच्या हातून सांडलवंड झालीकाचेचे पेले फुटले तरी बाई चिडल्या नाहीत त्यातूनही ख्रिस्ती धर्मीयांचे श्रेष्ठत्व सूचित करणे आहेअसाही एक तर्क टीकाकारांनी लढवला असेल.

शेवंतीबाई ब्रिटिश सत्तेशी एकनिष्ठ होत्या कापुस्तक इंग्लंडच्या महाराणींना अर्पण करणे व माजी गव्हर्नरच्या पत्नीची प्रस्तावना घेणे यामुळे सा तर्क बांधला तर ते स्वाभाविक म्हणता येईलपरंतु त्या काळात लिहिणाऱ्या अनेक लेखकांना ब्रिटिशांचे श्रेष्ठत्व मान्य होते – निदान काही अंशी तरीत्यामुळे अशी अर्पणपत्रिका हे केवळ निष्ठेचे द्योतक म्हणता येईल असे वाटत नाहीयाउलट कथेतील एक प्रसंग असा आहे, की त्यात रतनबाई एक कविता म्हणते, त्या कवितेचे शीर्षक आहे Casablanca. त्या कवितेत ब्रिटिशांच्या सैन्याविरोधात स्वत:ची बोट सांभाळणाऱ्या मुलाची कथा आहेती कविता प्रथम 1826 मध्ये प्रकाशित झाली होती व ती एका सत्य घटनेवर आधारित आहे असे समजतेत्यामुळे दोन्ही ग्रह दूर ठेवूनच या कथेचा आस्वाद घेण्यास हवा.

शेवंतीबाई यांनी प्रथम इंग्लंडला भेट दिली, ती (बहुदा) 1895 मध्ये. त्यांनी 1912-13 मध्ये पुन्हा युरोपचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी युरोप खंडातील शिक्षण आणि समाजकार्याच्या पद्धती यांची माहिती करून घेतली. त्यांनी अनेक संस्थांतून मुख्याध्यापक म्हणून काम केले. त्यांनी विवाहित महिलांसाठी वेगळी शाळा 1912-34 या काळात चालवली.

– रामचंद्र वझे 9820946547 vazemukund@yahoo.com

————————————————————————————————————————-

About Post Author

3 COMMENTS

  1. ..अदभुत! स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवणारे प्रेरणादायी पुस्तक!

  2. छान माहितीपूर्ण लेख.

    तत्कालीन भारतात राजकीय आणि सामाजिक गुलामगिरी होती, त्या परिस्थितीत ब्रिटिशांचे साम्राज्य स्वीकारून त्यांना पुस्तक अर्पित होणे, ह्यात वावगे वाटत नाही. मुळात पुस्तक स्त्रियांचे हक्क ह्या सामाजिक विषयावर भाष्य करण्यासाठी लिहिले असे दिसते.

    इंग्रज घटनाप्रेमी आणि न्यायप्रविष्ट होते, असे निदान उघडपणे दाखवत. तत्कालीन भारतात सामाजिक पातळीवर उद्धार होण्यात त्यांचाही थोडाफार हातभार आहेच. त्यामुळे उपरोक्त विषयावरील पुस्तक इंग्रज अधिकाऱ्यास अर्पित करणे ह्या भागावर जास्त प्रश्न उपस्थित न करता तत्कालीन उच्च वर्णीय कुटुंबात जर शिक्षण आणि स्त्रियांचे हक्क याबाबत तशी स्थिती असेल तर बहुजनांची स्थिती काय असावी याबाबत अंदाज बांधता येईल, ह्या बाबीकडे पुरेशा अभ्यासक दृष्टिकोनातून पाहता येईल.

  3. छान माहितीपूर्ण लेख.

    तत्कालीन भारतात राजकीय आणि सामाजिक गुलामगिरी होती, त्या परिस्थितीत ब्रिटिशांचे साम्राज्य स्वीकारून त्यांना पुस्तक अर्पित होणे, ह्यात वावगे वाटत नाही. मुळात पुस्तक स्त्रियांचे हक्क ह्या सामाजिक विषयावर भाष्य करण्यासाठी लिहिले असे दिसते.

    इंग्रज घटनाप्रेमी आणि न्यायप्रविष्ट होते, असे निदान उघडपणे दाखवत. तत्कालीन भारतात सामाजिक पातळीवर उद्धार होण्यात त्यांचाही थोडाफार हातभार आहेच. त्यामुळे उपरोक्त विषयावरील पुस्तक इंग्रज अधिकाऱ्यास अर्पित करणे ह्या भागावर जास्त प्रश्न उपस्थित न करता तत्कालीन उच्च वर्णीय कुटुंबात जर शिक्षण आणि स्त्रियांचे हक्क याबाबत तशी स्थिती असेल तर बहुजनांची स्थिती काय असावी याबाबत अंदाज बांधता येईल, ह्या बाबीकडे पुरेशा अभ्यासक दृष्टिकोनातून पाहता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here