यम-नचिकेत संवाद

0
59
carasole

उपनिषदे म्हणजे उप+नि+सद्. त्याचा अर्थ – जवळ जाणे, बसणे, रहस्य उलगडणे. उपनिषदे ही वेदांचे अंग ‘वेदान्त’ म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रथम वेद, नंतर ब्राह्मणे, आरण्यके व शेवटी उपनिषदे असा क्रम आहे.

विश्वाच्या शक्तीचे रहस्य कळण्याकरता प्रथम ती शक्ती आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी त्या शक्तीजवळ गेले पाहिजे. प्राचीन काळी तपोनिष्ठ ऋषींनी त्यांच्या ज्ञानाने विश्वाच्या शक्तीजवळ जाण्याचा मार्ग शोधला. त्यांत त्यांना जे ज्ञान प्राप्त झाले ते त्यांनी सूत्रबद्ध केले. तीच ‘उपनिषदे’.

ईश केन प्रश्न मुण्ड माण्डूक्य तित्तिरी |
ऐतरेयं च छान्दोग्यं बृहदारण्यकं तथा ||

अशी दहा उपनिषदे आहेत. शिवाय आणखी उपप्रकारही आहेत.

कृष्ण यजुर्वेदाच्या ‘कठ’ किंवा ‘काठक’ शाखेचे उपनिषद हे ‘कठोपनिषद’ म्हणून ओळखले जाते. कठोपनिषदात दोन अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायात तीन भाग आहेत. त्यांना ‘वल्ली’ असे नाव आहे. अध्याय एक मध्ये तीन वल्ली आहेत. त्यात वल्ली एकमध्ये एकोणतीस श्लोक आहेत. तर दुसऱ्या वल्लीत पंचवीस श्लोक आहेत. तिसऱ्या वल्लीत सतरा श्लोक आहेत. अशा प्रकारे प्रथम अध्यायात तीनही वल्ली एकमध्ये पंधरा श्लोक आहेत, वल्ली दोनमध्ये पंधरा श्लोक आहेत, वल्ली तीनमध्ये अठरा श्लोक आहेत. संपूर्ण कठोपनिषदात दोन्ही अध्यायांत सर्व वल्ली मिळून एकशेएकोणीस श्लोक आहेत.
कठोपनिषदात प्रामुख्याने यम-नचिकेत संवाद आहे.

– (आदिमाता, जानेवारी २०१६ वरून उद्धृत)

About Post Author