भ्रष्टाचारावर उतारा कायद्याच्या् चौकटीत की नितिमत्तेच्या?

0
26

     समाजाला जशी नैतिकतेच्‍या आधाराची आवश्‍यकता असते, तशीच राजकिय सत्‍तेलाही त्‍याची गरज भासत असते. इंदिरा गांधी सत्‍तेवर असताना नेहमी विनोबा भावे यांना भेटत असत.


      समाजाला जशी नैतिकतेच्‍या आधाराची आवश्‍यकता असते, तशीच राजकिय सत्‍तेलाही त्‍याची गरज भासत असते. इंदिरा गांधी सत्‍तेवर असताना नेहमी विनोबा भावे यांना भेटत असत. सत्‍तेचे प्रतिक विनोबांसारख्‍या व्‍यक्तिकडे येणे याचा अर्थ, त्‍या सत्‍तेला विनोबांच्‍या रूपाने नैतिकतेचा आधार मिळत होता. सत्‍ता नसलेला, मात्र नैतिक पाया असलेला एक यतीवर्ग समाजात निर्माण होणे गरजेचे आहे, असे विनोबा म्‍हणत. आज समाजात त्‍याच नैतिकतेचा अभाव जाणवतो.

     देशात सरकारी – बिनसरकारी अशा अनेक संस्‍था भ्रष्‍टाचाराविरोधात कार्य करत आहेत. त्‍यांचा उद्देश चांगला असला, तरी बहुतांश संस्‍थांचे काम हे कायद्याच्‍या चौकटीत सुरू आहे. भ्रष्‍टाचाराचा संबंध हा आचरणाशी येतो. त्‍यामुळे हा प्रश्‍न कायद्याच्‍या चौकटीत सोडवायचा, की नितिमत्‍तेच्‍या चौकटीत सोडवायचा, हा प्रश्‍न आपल्‍यासमोर उभा रहातो. आता यापैकी एक चौकट निवडायची, की या दोघांमधील फरक कमी करत जायचा, हा निर्णय समाजाला घ्‍यावा लागणार आहे.

शरद देशपांडे
पुणे विद्यापिठ,
निवृत्त तत्त्वज्ञान विभागप्रमुख

दिनांक – 29/04/2011

{jcomments on}

About Post Author

Previous article‘थिंक महाराष्ट्र’ प्रकल्प’
Next articleखांदेपालटानंतर लोकसत्तेचा रोख बदललेला
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.