फ्लायओव्हरवर बसची संख्या वाढणे गरजेचे

0
18

– अशोक दातार 

     मुंबई शहरात बांधण्‍यात आलेल्‍या लालबाग येथील फ्लायओव्‍हरचे उद्घाटन झाले. मात्र फ्लायओव्‍हर उभारणे कितपत फायद्याचे आहे, हे पाहणेही महत्‍त्‍वाचे ठरते. सायनपासून सीएसटीपर्यतच्‍या अकरा किलोमीटरच्‍या रस्‍त्‍यात सुमारे दोन तृतीयांश भाग (सात किलोमीटर) फ्लायओव्‍हरनी व्‍यापलेला आहे. फ्लायओव्‍हर बांधल्‍याने वाहतूक वेगवान होण्‍याची अपेक्षा असते, मात्र प्रत्‍यक्षात तसे घडत नाही.


– अशोक दातार

     मुंबई शहरात बांधण्‍यात आलेल्‍या लालबाग येथील फ्लायओव्‍हरचे उद्घाटन झाले. मात्र फ्लायओव्‍हर उभारणे कितपत फायद्याचे आहे, हे पाहणेही महत्‍त्‍वाचे ठरते. सायनपासून सीएसटीपर्यतच्‍या अकरा किलोमीटरच्‍या रस्‍त्‍यात सुमारे दोन तृतीयांश भाग (सात किलोमीटर) फ्लायओव्‍हरनी व्‍यापलेला आहे. फ्लायओव्‍हर बांधल्‍याने वाहतूक वेगवान होण्‍याची अपेक्षा असते, मात्र प्रत्‍यक्षात तसे घडत नाही.

     फ्लायओव्‍हर बांधल्‍यावर पहिले काही दिवस वाहतूक वेगात होते, मात्र काही काळानंतर वाहतुकीचा वेग मंदावतो. फ्लायओव्‍हरवरून वाहने वेगात जात असली तरी फ्लायओव्‍हरच्‍या दोन्‍ही टोकांवर वाहतुकीची कोंडी होत असल्‍याचे कालांतराने लक्षात येते. नुकत्‍याच बांधलेल्‍या लालबाग  फ्लायओव्‍हरचे उदाहरण घेतले, तर फ्लायओव्‍हरच्‍या सीएसटीच्‍या टोकाला सकाळी तर सायन दिशेच्या टोकाला सायंकाळच्‍या सुमारास वाहतुकीचे मोठे प्रमाण असते. वाहने फ्लायओव्‍हरच्‍या मधल्‍या भागावरून वेगाने जात असली तरी जेव्‍हा ती फ्लायओव्‍हरच्‍या मुखाजवळ येतात, तेव्‍हा तिथे वाहतुकीची कोंडी होत असल्‍याचे निदर्शनास येते. आधीच या भागात असलेली कोंडी वेगाने येणा-या वाहनांच्‍या संख्‍येमुळे वाढत जाते. रस्‍त्‍यांच्‍या तुलनेत वाहनांची संख्‍या जास्‍त असणे हे आणखी एक महत्‍त्‍वाचे कारण आहे. त्‍यामुळे वाहतुकीचा वेग वाढण्‍याच्‍या अपेक्षेने फ्लायओव्‍हर बांधण्‍यात येत असले, तरी त्‍यांचा मूळ उद्देश सफल होत नाही.

     या संदर्भात काही उपाय सुचवता येतात. फ्लायओव्‍हरवर वाहनांची संख्‍या कमी झाल्‍यास सगळीच वाहतूक वेगात होऊ शकेल यासाठी सार्वजनिक प्रवासी व्‍यवस्‍थेला अधिक वाव द्यायला हवा. फ्लायओव्‍हरवरून जाणा-या बसेसची संख्‍या वाढवायला हवी. त्‍यामुळे बसचा वेग वाढेल आणि प्रवाशांनाही बसने प्रवास करण्‍याची इच्‍छा होईल. एक बस तीन गाड्यांची जागा व्‍यापते आणि त्‍यात जवळपास पंचवीस गाड्यांचे प्रवासी सामावू शकतात! हा उपाय अवलंबल्‍यास वाहतूक आणि पर्यावरण, अशा दोन्‍ही बाजूंनी फायदे होऊ शकतील.

अशोक दातार, वाहतूक अभ्‍यासक, संपर्क – 9867665107

(प्रस्‍तुत लेखकाने ‘मुंबईतील वाहतूक’ या विषयावर अभ्‍यास केला असून त्‍याचे या विषयावरील ‘वाहतूक ठप्‍प, बसू नका गप्‍प’ हे पुस्‍तक प्रकाशित झाले आहे.)

{jcomments on}

About Post Author

Previous articleकाळा पैसा आणि दारू
Next articleदिलीप दोंदे यांचा सागर पृथ्‍वी प्रदक्षिणेचा पराक्रम
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.