जैतापूर की चिखलापूर ?

0
18

     जैतापूर आंदोलनाला सोमवार 18 एप्रिल रोजी हिंसक वळण लागले. त्याच रात्री ‘आयबीएन लोकमत’ या वृत्तवाहिनीवर जैतापूरविषयीचा तपशीलवार रिपोर्ट दाखवण्यात आला. यावेळी शिवसेना नेत्या निलम गोर्‍हे यांची दूरध्वनिवरून मुलाखत घेण्यात आली.

     त्यात गोर्‍हे यांनी ‘आमचे आंदोलन लोकशाही मार्गाने सुरू आहे’ असे विधान केले. त्यानंतर आयबीएनने तडक जैतापूर येथील आपल्या प्रतिनिधीस संपर्क साधला असता त्याने सांगितले, की शिवसेनेच्या काही आंदोलकांनी नाटे पोलिस ठाण्याला आग लावण्याचा प्रयत्न केला. या प्रतिनिधीने सांगितल्याप्रमाणे आंदोलक उग्र झाल्यामुळेच पोलिसांना गोळीबार करावा लागला. यातूनच शिवसेनेच्या कृतीतला विरोधाभास स्पष्ट होतो. जैतापूरात एवढा राजकीय चिखल झाला आहे, की त्यास जैतापूर न म्हणता ‘चिखलापूर’ म्हणावे लागेल.

     लोकसत्तेत दर मंगळवारी ‘वर्दीतला माणूस’ हे सदर प्रसिध्द केले जाते. पोलिसांवर नेहमीच टीका केली जाते, मात्र या सदरातून पोलिसांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन इतरांना केलेल्या मदतीच्या सत्यकथा प्रसिध्द केल्या जातात. हे एक सकारात्मक सदर असून अशी आणखी सदरे सुरू करणे गरजेचे आहे.

– अशोक जैन
पत्रकार-लेखक

दिनांक – 19/04/2011

{jcomments on}

About Post Author

Previous articleजैतापूर हिंसेची जबाबदारी शासनाची की शिवसेनेची?
Next articleसरकारने नखं बाहेर काढली
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.