चपखल उपमा!

0
66

आचार्य अत्रे यांच्या भाषणांत व लेखनात चपखल उपमा असायच्या.

समाजवादी पक्ष फाळणीच्या ठरावाच्या वेळी तटस्थ राहिला. त्या तटस्थ भूमिकेची कारणमीमांसा राम मनोहर लोहियांपासून सर्वांनी केली. अच्युतराव पटवर्धन म्हणाले,” आम्ही ठरावाला पाठिंबा दिला असता तर जातीयवादी ठरलो असतो. ठरावाला विरोध केला असता तर भांडवलवादी ठरलो असतो, म्हणून आम्ही तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.”

त्यावर अत्रे म्हणाले, ”तुमची भूमिका म्हणजे लग्न नाही केले तर निसर्गाच्या विरुध्द वागणे होते. लग्न केले तर ब्रम्हचर्य मोडते, म्हणून लग्न न करता बाई ठेवण्यासारखे आहे.”

ज्येष्ठ संपादक पां.वा.गाडगीळ हे अत्र्यांचे मित्र. अत्रे त्यांना ‘पांडोबा’ म्हणत असत. पां.वा. गाडगीळ म्हणत, ”मुंबई गेली हातून तर रडत बसू नका, विकासाच्या कामाला लागा.”

‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ असा आग्रह धरणा-या अत्र्यांना गाडगीळांचे म्हणणे कसे सहन होणार? अत्रे म्हणाले, ” आमचे पांडोबा म्हणतात, मुंबई गेली हातातून तर रडत बसू नका, विकासाच्या कामाला लागा, पांडोबांचे हे म्हणणे म्हणजे एखाद्या बाईचा नवरा मेला तर तिला सांगायचे, ‘बाई, तुमचा नवरा गेला अतिशय वाईट झाले, पण आता रडत बसू नका, वेणीफणी करायला लागा.”

About Post Author

Previous articleअकोला करार कशासाठी?
Next articleहोमी भाभा: भविष्यवेधी मार्गदर्शक (Homi Bhabha: A Prophetic Guide)
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.