कायदा करण्‍याचा अधिकार कुणाला

0
16

     लोकपाल विधेयकाबाबत ज्या चर्चा घडवल्या जात आहेत, त्यामध्ये कायदा करण्याचा अधिकार नक्की कुणाला हा प्रश्न पामुख्याने चर्चीला गेला. अनेकांचे असे म्हणणे आहे, की जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडूनच कायदा तयार करण्यात आला पाहिजे, तर काहींनी लोकपाल विधेयकासारख्या व्यापक पब्लिक इंटरेस्ट असलेल्या कायद्याच्या निर्मितीत जनतेचे मतही विचारात घ्यावे असे म्हटले. जनता ही सार्वभौम असल्यामुळे या प्रकारच्या विशिष्ट परिस्थितीत जनतेच्या सहभागातून

     कायदा तयार करण्यात काहीच चूक नाही.

     लोकपाल विधेयकाबाबत ज्या चर्चा घडवल्या जात आहेत, त्यामध्ये कायदा करण्याचा अधिकार नक्की कुणाला हा प्रश्न पामुख्याने चर्चीला गेला. अनेकांचे असे म्हणणे आहे, की जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडूनच कायदा तयार करण्यात आला पाहिजे, तर काहींनी लोकपाल विधेयकासारख्या व्यापक पब्लिक इंटरेस्ट असलेल्या कायद्याच्या निर्मितीत जनतेचे मतही विचारात घ्यावे असे म्हटले. जनता ही सार्वभौम असल्यामुळे या प्रकारच्या विशिष्ट परिस्थितीत जनतेच्या सहभागातून

     कायदा तयार करण्यात काहीच चूक नाही.

     आंदोलनाला जनतेकडून पाठींबा देण्यात येत असला तरी त्यांच्या इतर कार्यक्रमांना जनता पाठींबा देईल का हा प्रश्न निर्माण होतो.

     भ्रष्टाचाराबद्दल जनतेकडून क्षोभ व्यक्त्त करण्यात येत असला तरी सर्वसामान्य जनतेमध्येच भ्रष्टाचाराबाबत बराच विरोधाभास आढळतो. वाहतूक पोलिसाला 50 -100 रूपयांची लाच देताना आपल्या काहीच वाटत नाही आणि कलडमाडी – राजा यांच्याकडून लाखोकोटी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आल्यावर आपणच त्यांना दूषणे देतो. यावरून भ्रष्टाचाराबद्दलची आपली संवेदनशिलता घोटाळ्यांच्या आकड्यावर आधारलेली आहे असे वाटते. ही गोष्टी समाजाचे अध:पतन झाले असल्याचे स्पष्ट करते.

– शरद देशपांडे
पुणे विद्यापिठ,
निवृत्त तत्त्वज्ञान विभागप्रमुख

{jcomments on}

About Post Author

Previous articleदूरदर्शनवर मराठी भाषेची ऐशीतैशी
Next articleबातमी ऑब्जेक्टीव्ह असावी
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.