आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी

योगीराज बागूल यांनी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी’ हे पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर हर्षदीप कांबळे (आय ए एस) आणि दंतवैद्य विजय कदम यांनी ‘डॉ.बाबासाहेब विचार मंचा’च्या माध्यमातून बाबासाहेबांच्या त्या शिलेदारांचे एकवीस जिवंत वारस शोधून काढून त्यांचा मुंबईत भव्य सत्कार घडवून आणला ! त्यावेळी तेथे जमलेल्या त्या सत्कारमूर्तींच्या चेहऱ्यावरील कृतज्ञतेची भावना ही योगीराज यांच्या त्या अथक परिश्रमांची पावती होती… 

योगीराज बागूल यांच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी’ या पुस्तकाचे दोन खंड आहेत. पहिल्या खंडाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली ती 16 क्टोबर 2015 रोजी. दुसऱ्या खंडाची पहिली आवृत्ती क्टोबर 2021 रोजी. दोन्ही खंड ग्रंथालीने प्रसिद्ध केले. त्या दोन पुस्तकांनी एक वेगळीच खळबळ वाचकांच्या विचारविश्वात आणि आंबेडकरी चळवळीत उडवून दिली हे. तो महत्त्वाचा असा दस्तवज योगीराज बागूल या सतोड कामगाराच्या मुलाने परिश्रमपूर्वक तयार करून ठेवला आहे. मी त्या दोन्ही पुस्तकांच्या निर्मितीचा साक्षीदार आहेत्या पुस्तकांची निर्मिती सहजच्या चर्चेतून घडून आली आहे. पण ती काळाची गरज होती आणि ऐतिहासिक दस्तवज म्हणून त्या पुस्तकांचे मोल करता येणार नाही असे आहे !

दिनकर गांगल यांचा आणि माझा जुना परिचय आहे. मी सुब्रमणीय भारती-भारतीयार या तमिळ कवीच्या कण्णन पाट्टु या खंडकाव्यातील काही कविता भाषांतरीत केल्या होत्या. त्या संबंधात गांगल यांच्याशी बोलणे होई. त्यांना अशा घटनांत औत्सुक्य असते. त्यामुळे तो परिचय स्नेहात रूपांतरित झाला. मी तशा तेरा कवितांचे भाषांतर केले आहे. मी मुंबईत आलोकी त्यांच्या घरी जाणे होई. मी 2008 मध्ये एकदा त्यांच्याकडे चेंबूरला कण्णन पाट्टुच्या भाषांतराची संहिता घे  गेलो होतो. त्यावेळी मी माझे वडील दलितमित्र’ चंद्रकांत अधिकारी यांनी लिहिलेल्या खोती विरूद्धचा लढा’ या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर केले असल्याचेही त्यांना सांगितले. ते आंदोलन आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात दुर्लक्षित होत आहे. त्या चळवळीत बाबासाहेबांबरोबर सर्व जातिधर्मांचे लोक होते. त्यांतील काही खोत सवर्ण होते, जमीनदार होते, परंतु ते बाबासाहेबांसो सहकारी-शिलेदार म्हणून काम करत होते त्यांना समाजाने दिलेल्या हीन वागणुकीसंबधीही आमचे वडील सांगत असततेही मी बोललो. योगायोग असाकी त्या दिवशी थोडयाच वेळात एक तरुण लेखक गांगल यांच्या घरी आला. गांगल यांनी मला त्यांची ओळख करून दिली ते योगीराज बागूल. त्यांचे ‘पाचट’ हे आत्मकथन व आठवणींतील बाबासाहेब’ आणि ‘तमाशा विठाबाईच्या आयुष्याचा’ ही पुस्तके गाजत होती. आम्ही गप्पा मारू लागलो. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दलितेतर सहकाऱ्यांबद्दल तसे फारसे कोणाला फार माहीत नाही. त्या सहकाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सोसलेल्या सामाजिक बहिष्काराविषयी बोलत असताना गांगल म्हणालेकी याचे डॉक्युमेंटे व्हायला हवे आहे आणि ते कोणी सवर्णाने न करता दलित लेखक- अभ्यासकानेच करण्या हवे. त्यांनी बागूल यांना भरीस घातले; किंबहुना त्यांच्याकडे हट्टच धरलाकी बागूलतुम्ही सामाजिक समन्वयासाठी हे काम कराच बागूल यांनी ते काम खरोखरी मनावर घेतले.

बागूल यांची ती दोन पुस्तके वाचत असताना त्यांनी गेली पंधरा वर्षे केलेले किती परिश्रमकिती प्रवासभेटीगाठीमान-अपमान-धुत्कार हे सगळे आठव होते. जे काही ते शोधत आणि मिळवत होते त्याविषयी ते अधुनमधून माझ्याशी चर्चाही करत असत. बागूल यांनी मानेचा आणि कंबरदुखीचा त्रास सहन करत विस्मृतीत जात असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहकाऱ्यांना समाजापुढे आणून न्याय दिला आहे !

आंबेडकर यांचे दलितेतर सहकारी शोधावे कसे त्याचा एक संदर्भ म्हणून मी आमच्या घरी असलेला एक फोटो बागूल यांना आरंभीच दाखवला होता. बाबासाहेब महाडला 1946 मध्ये आलेले असताना काढलेल्या त्या फोटोत अकरा दलितेतर सहकारी एकत्र असल्याचे दिसतात. तेथून सुरुवात झाली आणि योगीराज यांनी त्या विस्मृतीत जात असलेल्या चोवीस सहकारी शिलेदारांची दुर्मीळ माहिती संकलित केली. परंतु असे एक पुस्तक काय प्रकारचे भावविश्व व विचारविश्व उभे करू कते त्याचा अनुभव आम्ही घेतला. योगीराज यांच्या पुस्तकाचा पहिला भाग केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित झाला आणि काही दिवसांतच हर्षदीप कांबळे (आय ए एस) आणि दंतवैद्य विजय कदम यांनी त्यांच्या डॉ.बाबासाहेब विचार मंचाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या त्या शिलेदारांचे एकवीस जिवंत वारस शोधून काढून त्यांचा मालाड येथे 2017 साली भव्य सत्कार घडवून आणला त्यावेळी तेथे आलेल्या त्या सत्कारमूर्तींच्या चेहऱ्यावरी कृतज्ञतेची भावना ही योगीराज यांच्या त्या अथक परिश्रमांची पावती होती काहींचे मन सद्गदित झाले तर काहींच्या डोळ्यांच्या पापण्या ओलावल्या. प्रत्येकाच्या मनात त्याच्या/तिच्या पूर्वजांप्रती कृतज्ञतेची व कृतार्थतेची भावना होती.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी’ या ग्रंथाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट संशोधन असा पुरस्कार मिळाला. तो ब्रुमिंग्टन येथील इंडियाना विद्यापीठाचे वरिष्ठ अभ्यासक आणि संशोधक प्रा. केव्हीन ब्राऊन यांच्या हस्ते आणि विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर यांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात 21 एप्रिल 2022 रोजी प्रदान करण्यात आला.

बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ ही केवळ दलित आणि नवबौद्ध किंवा पूर्वाश्रमीचे महार यांच्या उद्धाराची चळवळ नव्हती; तर ती चळवळ काळाच्या एका टप्प्यापर्यंत समाजाच्या वैचारिक उत्थानाची होती याची जाणीव ती दोन पुस्तके वाचून होते. त्यामुळेच ती चळवळ सर्व जातिधर्मांतील सहिष्णू विचारांच्या मंडळींत रुजली गेली याचे दर्शन पुस्तकांतून घडते व प्रश्न पडतोकी ती चळवळ पुढेआंबेडकर यांच्या हयातीतच दलितांमध्ये का पसरली व फोफावली आणि दलितेतर सहकारी चळवळीपासून दूर होत गेलेहर्षदीप कांबळे  विजय कदम यांच्या प्रयत्नांनी एका समारंभापुरता का होईना तो दुवा सांधला गेला !

– श्रीप्रकाश अधिकारी 9423806792/9273047889 shriprakashadhikari@gmail.com

——————————————————————————————

About Post Author

3 COMMENTS

  1. लेख आवडला, दलितेतर सहकारी चळवळी पासून दूर होत गेले ही दुर्दैवी बाब!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here