-
प्रत्येक मराठी माणसाने त्याच्या/तिच्या परिसराची सत्य माहिती द्यावी –
- कर्तबगार व्यक्ती - उपक्रमशील संस्था
- संस्कृतीचे वैभव – यात्रा, जत्रा, बाजार, किल्ले, लेणी... अगदी स्थानिक खाद्यपदार्थसुद्धा.
हे लिहून द्यावे, टिपावे, फोटोग्राफ, व्हिडिओत बद्ध करावे, ऑडिओ आधारे श्रवणपरंपरा जपावी... क्राऊड सोअर्सिंग हा लोकशाही यशाचा मंत्र आहे. (लिहिण्याकरता – लिंक) प्रत्येक जाणत्या, समंजस, संवेदनशील, विचारी माणसाने त्यचा भवताल याप्रमाणे टिपला तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा केवढा तपशीलवार व सूक्ष्म ‘डेटा’ संग्रहित होईल ! त्याची संगती शोधणे, अर्थ लावणे हे विद्वानांना मोठे काम होईल !
प्रत्येक मराठी माणसाने त्याचे किमान फक्त एक हजार रुपये या प्रकल्पास सहाय्य करावे. तर प्रकल्प पाच वर्षांत साकार होईल आणि तेव्हा संगणकाच्या/मोबाईलच्या पडद्यावर जणू महाराष्ट्राचे म्युझियम साकारलेले असेल. एका क्लिकवर महाराष्ट्राबाबत हवी ती माहिती उपलब्ध होईल. पक्षीय राजकारण व गुंडगिरी वगळून. तुमच्या सहकार्याविना ते स्वप्न अधुरे राहील.
कृती - ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर दोन नवीन माहितीपर लेख रोज प्रसिद्ध करावे अशी मनीषा आहे. ते मुख्यत: व्यक्ती - संस्था - संस्कृतिवैभव या तीन प्रकारांत व तालुका हे माहितीसंकलन केंद्र समजून संकलित केलेले असतील. -
मराठी संस्कृती आणि विद्यमान मराठी कर्तबगारी यांची माहिती तालुक्या तालुक्यांतून संग्रहित करून अवघ्या महाराष्ट्राचे समग्र चित्र साकार करू पाहणारा ध्येयनिष्ठ प्रकल्प.
नवे लेख
महाराष्ट्र भूषण धर्माधिकारी पितापुत्र
प्रसिद्ध निरूपणकार आप्पा धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला. देशपातळीवर जसा ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तसाच राज्य पातळीवर महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आहे. धर्माधिकारी कुटुंबीयांचे प्रेरक आणि समाजोपयोगी कार्य लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने त्याच कुटुंबासाठी पित्यापाठी पुत्राला असा हा दुसऱ्यांदा पुरस्कार दिला आहे...
नास्तिक आहे… म्हणूनच मस्त जगतो !
ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल स्पष्ट भूमिका घेणारे लोक जगात फार थोडे असतात; परंतु देव आहे की नाही याबाबत विचार करणारे लोक भरपूर असतात. किंबहुना, अगदीच भाविकभाबडे लोक वगळले तर प्रत्येक व्यक्तीच्या मनात कोणत्या ना कोणत्या प्रसंगी ‘देव मदतीला येईल का ? पण देव असेल तरच ना !’ असा प्रश्न उद्भवत असतो. त्याचे प्रमुख कारण माणसाची दुर्बलता व म्हणून हतबलता हेच असते. तथापि काही कणखर माणसे कोणत्याही संकटप्रसंगी मनाचा निर्धार कायम ठेवून केवळ बुद्धीने विचार करून निर्णय घेतात. अशाच बुद्धिनिष्ठ, तार्किक विचार करण्याची शक्ती कमावलेल्या लेखकाने तो नास्तिक कसा बनत गेला याची कहाणी येथे सांगितली आहे...
अचलपूरच्या नाम्याची भजी आणि…
अचलपूरची म्हणून म्हणता येतील अशी मोजकी चार-पाच हॉटेल्सच आहेत/ होती ! एरवी प्रत्येक शहरात हॉटेले आणि खाण्याच्या जागा असतात, तशा त्या अचलपुरातही आहेत. त्यांचा दर्जादेखील टपरीपासून ‘फाइव्ह स्टार’पर्यंत आहे. दुल्हा गेटने अचलपुरात प्रवेश केल्याबरोबर चावलमंडीमध्ये ‘बिना’ नावाचे हॉटेल कनकुरे यांच्या नावाने, थोडेसे अंतर चालून गेले, कीपुन्हा ‘बिन’ नावाचे हॉटेल लागे. ते भुरूमल यांच्या नावाने ओळखले जाई. श्री टॉकीजच्या टेकडीवर हॉटेलवजा एक टपरी होती ती ‘नाम्याचे भजे’ या नावाने ओळखली जाई...
आवाहन
लोकप्रिय लेख
इंदापूर – इतिहासातच राहिलेले शहर (Indapur Still Lives in History)
इंदापूर हे प्रसिद्ध कवयित्री शांता शेळके यांचे जन्मगाव. ते ऐतिहासिक महत्त्व असलेले पुणे जिल्ह्यातील सुंदर शहर. बालुशाहीसारखा दिसणारा खाजा, तिखटामध्ये केवळ वासाने भूक लागल्याची जाणीव करून देणारी पुरी भाजी आणि उजनी धरणाच्या गोड्या पाण्यातील मासे हे या शहराचे आकर्षण...
राजकारण आणि गुंडगिरी यांपासून दूर महाराष्ट्रातील विधायक घडामोडींचे दर्शन !
व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प