महंत राष्ट्र ते महाराष्ट्र!
मध्ययुगीन साहित्य हे कोणत्या ना कोणत्या तरी पंथ विचारातून निर्माण झाले. भक्ती आणि संप्रदाय यांच्यावरील निष्ठा हे त्या साहित्याचे वैशिष्ट्य होते. त्यात महानुभाव हा पंथ महत्त्वाचा आहे. त्यांच्या साहित्यातून लोकभाषेला ग्रांथिकतेचा दर्जा मिळाला व ती धर्मभाषा बनली. तोपर्यंत तेथे संस्कृत भाषेचा पगडा होता. श्रीचक्रधर स्वामी हे महानुभाव पंथाचे संस्थापक. त्यांचा महाराष्ट्रातील परिभ्रमणाचा काळ 1267 ते 1274 हा मानला जातो. त्यांनी गोदावरीच्या दोन्ही तीरांवर परिभ्रमण करून तो पंथ महाराष्ट्रात रुजवण्याचे व तत्कालीन धर्मसुधारणेचे कार्य केले.